Breaking News

नवाब मलिक म्हणाले, तुम्ही राज्यपाल आहात मुख्यमंत्री नाही विभाग आणि राज्य सरकारला न विचारताच राज्यपालांकडून उद्घाटनाचा कार्यक्रम जाहिर

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यापासून महाविकास आघाडी सरकार विरूध्द राज्यपाल असा सामना सातत्याने राज्यातील जनतेला पाह्यला मिळत असून या संघर्षातील आता नवा अंकाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. अल्पसंख्याक विभागाने बांधलेल्या वसतिगृहांच्ंया उद्घाटनाचा कार्यक्रम राज्यपाल भगतसिंग यांनी परस्पर जाहिर केला असून त्यासाठी ते विमानाने ५ तारखेला नांदेड, परभणी येथे जाणार आहेत. त्यामुळे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत तुम्ही राज्यपाल आहात मुख्यमंत्री नाही अशी खोचक आठवण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करून दिली.

महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर, महाराष्ट्राचे राज्यपाल हे वारंवार सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप करत असतात, हे दिसून येत असल्याचे वक्तव्य करत सरकारने केलेल्या कामांचं परस्पर उद्घाटन केलं जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच, सरकारने केलेल्या कामांचं परस्पर उद्घाटन केलं जात असल्याचंही यावेळी मलिक यांनी बोलून दाखवलं.

आपल्या माहितीसाठी मी राज्यपालांच्या एका दौऱ्याची माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यपाल ५ ऑगस्ट रोजी सकाळी विमानाने नांदेडला जात आहेत, त्या दौऱ्याबाबत जो कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये दोन कार्यक्रम जे विद्यापीठात होणार आहेत. त्या कार्यक्रमात राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने बांधलेले दोन हॉस्टेल आहेत, एक बॉईज आणि एक गर्ल्स हॉस्टेल आहे. याची बांधकामं पूर्ण झालेली आहेत. मात्र आम्ही विद्यापीठांकडे ते हॉस्टेल्स अजून वर्ग केलेले नाहीत, हा अधिकार राज्य सरकारचा आहे. त्याचे उद्घाटन करणे आणि मग विद्यापीठाकडे देण्याचा अधिकार आहे. प्रशासकिय कामकाजाबाबतचा अधिकार हा राज्यपालांचा आहे. पण सरकारने केलेली कामं अल्पसंख्याक विभागाला न विचारता, सरकारला न विचारता थेट कार्यक्रम आयोजित करून दोन उद्घाटनांचा कार्यक्रमांमध्ये जाहीर करण्यात आलेला असल्याचे ते म्हणाले.

जाहिर झालेल्या दौऱ्यानुसार ५ ऑगस्ट रोजी राज्यपाल हे जिल्हाधिकारी कार्यालयात जावून जवळपास १ तास ५० मिनिटे हे जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेणार आहेत. नांदेड दौरा संपल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ तारखेला हिंगोलीत कुठलाही राज्यपालांचा कार्यक्रम नाही, तिकडे कुठलेही विद्यापीठ नाही. तरी हिंगोलीला ते जाणार असून सकाळी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यलायत त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांसोबत १ तास ५५ मिनिटांची आढावा बैठक घेणार आहेत. तिथून पुढे ते परभणीला जाणार आहेत. परभणीला कृषी विद्यापीठ आहे, तिथे काही कार्यक्रम होऊ शकतात त्याबाबत आमचा कुठलाही आक्षेप नाही. पण ६ तारखेला पुन्हा चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यपालांचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे. तिकडे दोन तास जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पुन्हा आढावा बैठकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. एकंदरीत कुठेतरी राज्यपाल हे दोन पॉवर सेंटर असल्याचं चित्र निर्माण करण्याचं काम करत आहेत का? अधिकार व जबाबदारी निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे अधिकार वर्ग केल्यानंतर, जर एखादी माहिती त्यांना अपेक्षित असेल तर त्यांची जबाबदारी आहे की या राज्याचे मुख्य सचिवांना त्यांनी माहिती मिळवण्यासाठी पत्राद्वारे माहिती मागवली पाहिजे. पण तसे न करता थेट राज्य सरकारच्या अधिकारांचा वापर स्वतः करत आहेत. थेट तीन-तीन जिल्ह्यांमध्ये जाऊन, जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेत आहेत. म्हणजेच कुठंतरी दोन वेगळे पॉवर सेंटर असल्याचे चित्र निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

अनिल देशमुख भारतातच-मलिक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही चुकिचे कृत्य केलेले नाही. त्यांच्यावरील कारवाई ही राजकिय सूडापोटी सुरु करण्यात आल्याचा पुर्नरूच्चार करत देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत ईडीने त्यांना सातत्याने समन्स बजाविणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत देशमुख हे भारतातच आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

भावना गवळी यांची नाराजी दूर, प्रचारात उतरणार

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यावर सध्या ईडीची टांगती तलवार असून १८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *