Breaking News

अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे मागितली माफी राज्यपाल कोश्यारी यांनी क्षमा करण्याची राज्यातील जनतेला विनंती

दोनच दिवसांपूर्वी अंधेरी येथील रस्त्याचे नामकरण सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाणे येथून गुजराती-राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर भाजपा आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट वगळता सर्वच राजकिय पक्षांनी तीव्र शब्दात राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत जाहीर टीका. अखेर या जनरेट्यापुढे झुकत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागितली.

राज्यभरात कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या विरोधात निदर्शनेही झाली. अखेर या साऱ्या रेट्यापुढे झुकत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी राज्यातील जनतेने क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुर्नःप्रत्यय देईल असे सांगत महाराष्ट्राची सपशेल माफी मागितली. महाराष्ट्राच्या राजकिय इतिहासात राज्यपालांकडून आपल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल जाहिर माफी मागण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वीही राज्यपाल कोश्यारी यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतीराव फुले यांच्याबद्दल अवमानकारक पध्दतीचे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत शिवाजी महाराजांचे गुरू रामदास स्वामी असल्याचेही वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईबाबत विधान केले.

राज्यपाल भवनाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रक खालील प्रमाणे…

दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली.
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.
महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.

भगत सिंह कोश्यारी
राज्यपाल, महाराष्ट्र

Check Also

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…

राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *