Breaking News

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये अनुदान द्या शिवसेनेची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ५०० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे.

मध्य प्रदेश सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल  ८०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर राज्यातही भावांतर योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या द्राक्षे डाळिंब लसूण या शेतीमाल खरेदी आणि निर्यात करणार्यां व्यापारी वर्गाला २५ ते ३० टक्के वाहतूक अनुदान दिले जाते. कांद्यांची खरेदी आणि निर्यात करणाऱ्यांना ही वाहतूक सवलत दिली जावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *