Breaking News

साई रिसॉर्टप्रकरणी उच्च न्यायालयाचे ईडीला आदेश, अटक करू नका अनिल परब यांना न्यायालयाचा दिलासा- सोमवारपर्यंत अटकेपासून संरक्षण

ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री अनिल परब यांनी मनी लॉडरिंग करत दापोलीत साई रिसॉर्ट बांधला. तसेच हा रिसॉर्ट बांधताना सीआरझेड आणि पर्यावरण विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत याप्रकरणाची तक्रार ईडीकडे केली. त्यानंतर ईडीने याप्रकरणी अनिल परब यांची तीन वेळा चौकशी केली. तर दोन वेळा त्यांच्या शासकिय आणि खाजगी निवासस्थानी छापेमारी केली. तसेच याप्रकरणी ईडीने या रिसॉर्टचे मालक तथा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना नुकतीच अटक केली. यापार्श्वभूमीवर अनिल परब यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपल्या विरोधात पर्यावरण विभागाने दाखल केलेली ईसीआयआर रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल केली. त्यावर आज मंगळावारी मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला आदेश देत अनिल परब यांना दिलासा दिला.

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल परब यांना २० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. सोमवारपर्यंत परब यांना अटक करू नका, असा आदेश न्यायालयाने ईडीला दिले. त्यामुळे साई रिसॉर्ट मनी लाँडरींग प्रकरणात अनिल परब यांना तूर्तास दिलासा मिळाला. वकील अमित देसाई यांनी न्यायालयात अनिल परब यांच्या बाजुने युक्तिवाद केला.

अमित देसाई यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने परब यांना अटकेपासून संरक्षण दिले. खरं तर, दोन दिवसांपूर्वी दापोलीतील साई रिसॉर्टशी संबंधित मनी लाँडरींग प्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केली. त्यानंतर परब यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
संबंधित साई रिसॉर्टची मालकी अनिल परब यांच्याकडे नसून रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्याकडे असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय कदम यांनी केला होता.

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *