Breaking News

मुंबई

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान १९ एप्रिल, २६ एप्रिल, …

Read More »

सेव्हन हिल्सवर महानगरपालिकेचा महिन्याला ९ कोटी खर्च तर दरमहा ४ कोटींचे नुकसान

अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबईच्या आरोग्य सुविधांसाठी अत्यंत महत्वाचे व मोक्याचे हॉस्पिटल आहे, सध्या न्यायप्रविष्ठ असलेले हे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेनेचे चालवले पाहिजे अशी सातत्याने मागणी केली जात आहे. २०२० पासून महानगरपालिका या हॉस्पिटलवर दरमहिना ९ कोटी रुपये खर्च करते आणि उत्पन्न केवळ ५ कोटी रुपये होत आहे. महापालिकेला महिन्याला …

Read More »

पिता विजयपथ सिंघानिया आणि मुलगा गौतम यांच्यात समेट?

प्रसिध्द उद्योगपती विजयपथ सिंघानिया यांनी त्यांचा विभक्त मुलगा आणि रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्यासोबत कोणताही समेट घडवून आणल्याचा इन्कार केला आहे. २०१५ मध्ये रेमंड समूहाचे अध्यक्षपद सोडलेले विजयपत सिंघनिया म्हणाले की, २० मार्च रोजी विमानतळावर जात असताना त्यांना त्यांच्या मुलाच्या सहाय्यकाचा फोन आला. विजयपथ सिंघानिया म्हणाले, गौतम सिंघानियाचा सहाय्यक …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मंत्र्याच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना डांबले

भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांचे चिरंजीव धृव गोयल यांच्या ठाकूर कॉलेज मध्ये कार्यक्रमात संबोधित करायला गेले होते, तेव्हा विद्यार्थ्यांना डांबून बसविण्यात आले त्यावर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला. जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांनी रंग पकडतो विद्यार्थी एखादी भूमिका घेतो तेव्हा तेव्हा तेव्हा देशात मोठे बदल झाले असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी …

Read More »

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च, २०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहिर केला आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. १७ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत राज्यात १ लाख ८४ हजार ८४१ इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे …

Read More »

CBSE बोर्डाच्या २० शाळांवर कारवाईः दिल्लीसह महाराष्ट्रातील शाळांचाही समावेश

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) देशभरात गैरप्रकारात गुंतलेल्या शाळांवर कडक कारवाई केली आहे, तसेच २० शाळा बंद केल्या आहेत आणि तिघांची श्रेणी कमी केली. CBSE सचिव हिमांशू गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, अचानक तपासणीत संलग्नता आणि परीक्षा नियमांचे पालन करण्यामध्ये तफावत आढळून आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले. बाधित शाळांपैकी पाच दिल्लीत …

Read More »

इक्बाल सिंह चहल थेट मुख्यमंत्री कार्यालयातः आदित्य ठाकरे यांची टीका

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होताच निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झाले आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले. परंतु राज्य सरकारने राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या ऐवजी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना महानगरपालिकेच्या पदावर कायम ठेवण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर सुरु केला. मात्र अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इक्बालसिंह चहल यांची …

Read More »

उमेश पाटील यांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी सांगून सुध्दा ज्यांचे शेपूट सरळ…

मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा शिवतारे यांचे शेपूट सरळ झाले नाही त्यामुळे त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली असून मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन उमेश पाटील यांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्यावर जोरदार …

Read More »

ऑस्ट्रेलिया भारताशी शिक्षण, कौशल्य विकास, पर्यटन सहकार्य वाढविणार

ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आज येथे दिली. पॉल मर्फी यांनी गुरुवारी (२१ मार्च) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेब म्हणणे हा देशद्रोह

देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर वाढविणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी करणे हा देशद्रोह आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि काश्मिरमधिल ३७० कलम रद्द करण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केले. त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणे हा देशाचा अपमान असून …

Read More »