मुंबई : प्रतिनिधी
राज्यात missionbeginagain अंतर्गत अनलॉक-५ जाहीर करत असताना बार-रेस्टॉरंट सुरु करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र या गोष्टी उघडण्याची-बंद करण्याच्या वेळा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले. त्यामुळे सर्व जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळा जाहीर करण्यात आल्याने बार-रेस्टॉरंट चालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येवू लागली. अखेर यावर तोडगा काढत या व्यवस्थापनासाठी सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १० वाजे पर्यत सुरु ठेवण्यास परवानगी दिली.
बार-रेस्टॉरंट सुरु केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रशासनाकडून वेगवेगळ्या वेळा जाहीर करण्यात येवू लागले. त्यामुळे बार-रेस्टॉरंट चालकांमध्ये गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच उत्पादन शुल्क विभागाकड़ूनही वेगवेगळी वेळापत्रक जारी करण्यात येवू लागले. अखेर यासर्वांवर मार्ग काढण्यासाठी पर्यावरण विभागाने पुढाकार घेत यासंबधीचे वेळापत्रकच जाहीर केले.