Breaking News

कोरोना: कालच्यापेक्षा मृतकांची संख्या कमी मात्र रूग्ण संख्येत वाढ ३ हजार ७५२ नव्या रूग्णांचे निदान तर १०० मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्याठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु असून त्याचाच परिणाम आजच्या मृतकांच्या संख्येवर दिसून येत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला नव्या रूग्णांची संख्या मात्र वाढताना दिसत असून आज ३७५२ रूग्ण आढळून आले. तर १०० मृतकांची नोंद झाली आहे. तर १६७२ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने बरे झालेल्यांची संख्या ६० हजार ८३८ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५३ हजार ९०१ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच आज जरी रूग्णवाढीची संख्या वाढलेली दिसत असली तरी रूग्ण दुपटीचा वेग ३ टक्के आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ५०.४९ % एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ४.७७ %. सध्या राज्यात ५,८१,६५० लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २२०३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ९२,१४१ खाटा उपलब्ध असून सध्या २६,७४० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ५८ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०१ प्रयोगशाळा कोविड१९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१७६८३ नमुन्यांपैकी १,२०,५०४ ( १६.९३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्ण वाढीचा आणि रुग्ण दुप्पट होण्याचा वेग

दिनांक रुग्ण वाढीचा दराची साप्ताहिक सरासरी रुग्ण दुपटीचा कालावधी
३१ मार्च १२ % ३.५ दिवस
३० एप्रिल ७ % १०.२ दिवस
३१ मे ४ % २०.१ दिवस
१६ जून ३ % २५.९ दिवस

आज मृत्यू पावलेले..

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ९९ मुंबई -६७, भिवंडी – २७, ठाणे -४, वसई विरार – १
नागपूर नागपूर मनपा -१

जिल्हानिहाय रूग्ण, मृत आणि बाधित रूग्णांची संख्या…

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ६२८७५ ३१८५६ ३३११ २७७००
ठाणे २१०९३ ८९८८ ६७३ ११४३१
पालघर २८५३ ९६० ८३   १८१०
रायगड २१६६ १४१२ ८६ ६६६
रत्नागिरी ४७२ ३१२ १८   १४२
सिंधुदुर्ग १६१ ९९   ५९
पुणे १४००० ७५८५ ६१०   ५८०५
सातारा ७९१ ५०५ ३४ २५१
सांगली २७३ १४५ ११   ११७
१० कोल्हापूर ७३६ ६४६   ८२
११ सोलापूर २०६१ ८८० १८४   ९९७
१२ नाशिक २३०६ १३६८ १३४   ८०४
१३ अहमदनगर २५५ १९८ १२   ४५
१४ जळगाव २०३१ ९२९ १७६   ९२६
१५ नंदूरबार ७२ ३३   ३३
१६ धुळे ४६६ २७८ ५१ १३६
१७ औरंगाबाद ३०६४ १६७६ १६८   १२२०
१८ जालना ३१९ २०१ १२   १०६
१९ बीड ८२ ५६   २४
२० लातूर २०१ १२७ १३   ६१
२१ परभणी ८३ ७३  
२२ हिंगोली २४३ १९५   ४७
२३ नांदेड २६६ १६४ १२   ९०
२४ उस्मानाबाद १६१ १२३   ३०
२५ अमरावती ३८६ २७३ २७   ८६
२६ अकोला ११२६ ६७४ ५६ ३९५
२७ वाशिम ६६   ५४
२८ बुलढाणा १४९ ९१   ५३
२९ यवतमाळ २१० १४२   ६३
३० नागपूर ११५४ ६५१ १३   ४९०
३१ वर्धा १४  
३२ भंडारा ५८ ४१   १७
३३ गोंदिया १०१ ६९   ३२
३४ चंद्रपूर ५७ ३०   २७
३५ गडचिरोली ५१ ४१  
  इतर राज्ये/ देश १०२ २०   ८२
  एकूण १२०५०४ ६०८३८ ५७५१ १४ ५३९०१

( टीपआयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १७१ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.)

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *