मुंबई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका दलित मुलीवर सामुदायिक बलात्कार करून तिला मारहाण केली. त्यानंतर सदर मुलीवर दिल्लीतील सफदरजंग रूग्णालयात उपचार सुरु असताना तिचे निधन झाले. सदर मुलीचे पार्थिव तिच्या कुटुंबियांच्या हाती देण्याऐवजी पोलिस प्रशासनाने परस्पर स्मशानभूमीत नेवून अंत्यसंस्कार केले. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या आणि पोलिस प्रशासनाच्या कार्य पध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान सदर मुलीच्यां कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे हाथरसला चालले असता पोलिसांनी त्यांना रस्त्यावरच अडविले. तसेच त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून या झालेल्या धक्काबुकीत ते खाली पडले. पोलिसांनी केलेल्या कृत्याचे पडसाद महाराष्ट्रात तीव्र उमटले.
भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून देण्यात आलेली वाईट वागणूक हि निषेधार्थ असून त्याचा आम्ही निषेध करतो. तसेच लोकशाहीत हे निंदनीय कृत्य असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली.
Reckless behaviour of UP Police towards @INCIndia leader Shri @RahulGandhi is extremely condemnable. It is reprehensible for those who are supposed to uphold the law to trample upon the democratic values in such a manner.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 1, 2020
श्री. @RahulGandhi हे हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात असता @Uppolice कडून झालेल्या दडपशाहीचा जाहीर निषेध आहे. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे, याचा न्याय मी युपीच्या मुख्यमंत्र्यांकडे मागते – खा. @supriya_sule pic.twitter.com/Kd6PDncSun
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 1, 2020
हाथरस जा रहे @RahulGandhi जी और @priyankagandhi जी के साथ जो बर्ताव किया गया। इससे यह साबित होता है कि उत्तर प्रदेश में कानून का नहीं, बल्की जंगलराज है। इसकी नैतिक जिम्मेदारी लेते हुए मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने तुरंत इस्तीफा देना चाहिए। #JusticeForIndiasDaughters pic.twitter.com/Vnh7OqEg29
— Ashok Chavan (@AshokChavan1958) October 1, 2020
State sponsored violence in UP is at its peak. Why were Congress leaders Rahul and Priyanka Gandhi prevented from going to #Hathras to condole the family? Why were they detained? I condemn the manhandling of Congress leaders. What is CM Adityanath afraid of? He must be sacked.
— Prithviraj Chavan (@prithvrj) October 1, 2020