Breaking News

६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान ४ हजार ७७१ रिक्तपदांसाठीही मतदान

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील विविध २५ जिल्ह्यांमधील ६५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ३३ जिल्ह्यांतील सुमारे २ हजार ८१२ ग्रामपंचायतींमधील ४ हजार ७७१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी  २७ मे २०१८ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

आयोगाच्या प्रसिद्धिपत्राकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी ७ ते १२ मे २०१८ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी १४ मे २०१८ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १६ मे २०१८ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान २७ मे २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०  या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी ७.३० पासून दुपारी केवळ ३.०० पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २८ मे २०१८ रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 187, सिंधुदुर्ग-2, नाशिक- 20, धुळे- 7, जळगाव- 8, अहमदगनर- 77, पुणे- 90, सोलापूर- 3, सातारा- 23, सांगली- 82, कोल्हापूर- 74,औरंगाबाद- 4, बीड- 2, नांदेड- 7, परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 2, यवतमाळ- 29, वर्धा- 14, भंडारा- 4आणि गडचिरोली- 2. एकूण- 654.

पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे (90)- 167,पालघर (73)- 144, रायगड (93)- 158, रत्नगिरी (202)- 299, सिंधुदुर्ग (74)- 104, नाशिक (200)- 318, धुळे (34)- 49,जळगाव (57)- 96, नंदुरबार (32)- 36, अहमदगनर (78)- 124, पुणे (258)- 456, सोलापूर (93)- 154, सातारा (409)- 777,सांगली (40)- 81, कोल्हापूर (87)- 126, औरंगाबाद (34)- 41, बीड (24)- 35, नांदेड (106)- 177, परभणी (28)- 40,उस्मानाबाद (48)- 65, जालना (21)- 28, लातूर (79)- 94, हिंगोली (41)- 55, अमरावती (80)- 121, अकोला (23)- 31,यवतमाळ (110)- 167, वाशीम (20)- 23, बुलडाणा (39)- 72, वर्धा (49)- 72, चंद्रपूर (74)- 106, भंडारा (6)- 48, गोंदिया (35)- 43  आणि गडचिरोली (175)- 464. एकूण (2,812)- 4,771.

 

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *