Breaking News

गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची सखोल चौकशी करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आश्वासन

हिंगोली – वसमतनगर: प्रतिनिधी

ईव्हीएम मशिन्स हँक करण्यासंदर्भातील माहिती स्व. गोपीनाथ मुंडे असल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट सुप्रसिध्द हँकर सय्यद सुजी याने केला. त्यानंतर भाजप मधील ज्येष्ठ नेत्यांनी बोलण्याचे टाळलेले असले तरी सत्तेत आल्यानंतर स्व.मुंडे यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे शोधण्याची जबाबदारी आपल्यावर असून तुमचं माझं सरकार आल्यावर त्यांच्या हत्येची सखोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिले.

वसमतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन संपर्क यात्रा आल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार गणेश दुधगावकर, हिंगोली जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल आदी नेत्यांसह वसमतनगर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर जे वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. लोकनेत्याचा इव्हीएम प्रकरणात मृत्यू होत असेल तर हे चांगले नसल्याचे त्यांनी सांगितले.  

नरेंद्र मोदी यांची पाच वर्षे झाली कर्जमाफी देतो सांगून आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो सांगून परंतु यांची पहिली कॅबिनेट अद्याप झालेली नाही. या दोघांनाही आता जनतेचा विसर पडला आहे. त्यामुळे यांच्यावर विश्वासच राहिला नसल्याचा टोला लगावत या देशात शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी देणारा एकच नेता शरद पवार हेच आहेत. परंतु या सरकारने शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

पाच वर्ष झाली काळा पैसा आलेला नाही. या सरकारने फसविल्याची मानसिकता देशातील जनतेची झाली आहे. हीच जनता आता यासरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. पाच राज्यात साम दाम दंड भेद वापरूनही भाजपाचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता विविध प्रकारची आश्वासने द्यायला लागले असल्याची टीकाही त्यांनी केली.

असंगाशीपटत नसेल तर सोडा ना: छगन भुजबळ

या सरकारने कर्जमाफी दिली नाही… अनेक अटी टाकल्या.. उध्दव ठाकरे म्हणाले कर्जमाफी महाघोटाळा आहे मग तुम्ही तिथे कसे… नंतर म्हणाले पहारेकरी चोर आहे…अरे असंगाशी संग कशाला… पटत नसेल तर सोडा ना… परंतु ते त्यांच्यासोबत बसत आहेत अशी उपरोधिक टीका माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केली.

भाजपच्या सरकारमध्ये आज हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत…. त्यांच्या पत्नींनी आत्महत्या केल्या… व्यापारी, उद्योजक आत्महत्या करत आहेत काय चाललेय या सरकारचे असा सवालही त्यांनी केली.  

समाजातील सर्व घटकांना जो त्रास होतोय तो त्रास संपवण्यासाठी राष्ट्रवादीची परिवर्तनाची यात्रा सुरु आहे. तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी आलोय. हे संत नामदेवांचे शहर आहे. तुम्ही साथ द्या आम्ही लढायला तयार आहोत असे आवाहनही त्यांनी केले.

पुरोहितांना सरकार महिना ५ हजार रुपये देणार आहे. एका घरात ४ असतील तर २० हजार रुपये आले ना. अरे काळ्या आईची दिवसरात्र सेवा करतोय त्या शेतकऱ्यांना का देत नाही. त्यांना ५० हजार रुपये द्या ना. परंतु हे सरकार माझ्या शेतकऱ्याला देत नसल्याचा आरोप करत योगी नरेंद्रचा एकच नारा..ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुम्हारा… असा जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…

राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *