Breaking News

सरकार प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचे कर्ज नव्याने घेणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ३१३ बांधकामाधीन पाटबंधारे प्रकल्पांपैकी ५२ प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रूपयांची गरज आहे. हे कर्ज घेण्यासाठी आझ झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सद्यस्थितीत राज्यातील ३१३ बांधकामाधीन प्रकल्पांवर आहेत. या प्रकल्पांवर ८३ हजार ३०० कोटी रूपयांचा खर्च झालेला आहे. उर्वरित कामासाठी ९३ हजार ५७० कोटी रूपयांची गरज लागणार आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी १० हजार कोटी रूपयांचा निधी जलसंपदा विभागास उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र हा निधी कमी पडत असल्याने अतिरिक्त १५ हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यासाठी नव्याने कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यामुळे हे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील २.८९ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
या ५२ प्रकल्पांमध्ये विदर्भातील १६ प्रकल्प, मराठवाड्यातील ७ प्रकल्प आणि उर्वरित महाराष्ट्रातील २९ प्रकल्पांचा समावेश राहणार आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *