Breaking News

राज्यात नवे ४६६ रूग्णांचे निदान तर ५७२ जणांना घरी पाठविले कोरोनाग्रस्तांची संख्या ४६६६ वर पोहोचली

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात कालच्या तुलनेत आज जवळपास १०० रूग्णांच्या संख्येत घट झाली असून आज ४६६ नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. रविवारी हीच संख्या ५५२ वर पोहोचली होती. मात्र नव्याने निदान झालेल्या रूग्णांच्या संख्येत घरी पाठविलेल्या रूग्णांची संख्या ५७२ आहे. त्यामुळे एकाबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असली तरी रोज रूग्ण बरे होवून घरी जाण्याच्या संख्येतही चांगलीच वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ६६६ वर पोहोचली असून आज ९ कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यूही झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज राज्यात ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ७ आणि मालेगाव येथील २ येथील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ६ पुरुष तर ३ महिला आहेत. आज झालेल्या ९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या २ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये ( ७१ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३२ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६,०९२ नमुन्यांपैकी ७१,६११ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४६६६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

कोविड१९ रुग्णांच्या विश्लेषणातून समोर आलेल्या महत्वपूर्ण बाबी –
राज्यातील २३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी १८९० ( ८१%) रुग्ण हे लक्षणविरहित आहेत तर ३९३ रुग्णांना ( १७ %) रुग्णांना लक्षणे होती. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण ( २ %) हे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५६४८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २१.८५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –
. सध्या राज्यात ९३,६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,८७९. लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ३०३२ १३९
ठाणे २०
ठाणे मनपा १३४
नवी मुंबई मनपा ८३
कल्याण डोंबवली मनपा ८४
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा
मीरा भाईंदर मनपा ७८
पालघर १७
१० वसई विरार मनपा १०७
११ रायगड १५
१२ पनवेल मनपा ३३
  ठाणे मंडळ एकूण ३६०७ १५५
१३ नाशिक
१४ नाशिक मनपा
१५ मालेगाव मनपा ८५
१६ अहमदनगर २१
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे
१९ धुळे मनपा
२० जळगाव
२१ जळगाव मनपा
२२ नंदूरबार
  नाशिक मंडळ एकूण १२९ १२
२३ पुणे १८
२४ पुणे मनपा ५९४ ४९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५१
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा २१
२८ सातारा १३
  पुणे मंडळ एकूण ६९७ ५५
२९ कोल्हापूर
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली २६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी
  कोल्हापूर मंडळ एकूण ४३
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा २९
३७ जालना
३८ हिंगोली
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण ३३
४१ लातूर
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा
  लातूर मंडळ एकूण १२
४७ अकोला
४८ अकोला मनपा
४९ अमरावती
५० अमरावती मनपा
५१ यवतमाळ १५
५२ बुलढाणा २१
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ५९
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ६७
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण ७३
  इतर राज्ये १३
  एकूण ४६६६ २३२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *