Breaking News

मुंबई महानगरची ४ हजार तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारावर ३ दिवसात १५०० ने वाढली: १९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील मागील दोन दिवसात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १०१८ वर पोहचली होती. त्यात आज नव्याने ५५२ रूग्णांची नोंद झाल्याने तीन दिवसात १५०० ने संख्या वाढली असून कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५ हजार २१८ वर पोहोचली आहे. मुंबई महानगरातील रूग्णांची संख्या ४ हजार ७७ वर पोहोचली असून तर २४ तासात १९ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ७२२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज राज्यात १९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३,१११ नमुन्यांपैकी ७७,६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
१. सध्या राज्यात ९९,५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
3. सॅनिटेशन डोम अथवा टनेल यांचा वापर न करणेबाबत – सध्याच्या कोविड१९ च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी व्यक्ती/ समूहावर जंतुरोधक रसायने फवारण्यासाठी सॅनिटेशन डोम अथवा टनेलचा वापर होताना दिसत आहे तथापि या वापरास कोणताही शास्त्रीय आधार नाही.
✔ व्यक्ती अथवा गटावर अशाप्रकारे जंतुरोधक रसायने फवारणे शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या हानीकारक आहे.
✔ कोविड१९ संसर्गित वातावरणातून आलेल्या व्यक्तीवर अशी रसायने फवारल्याने संसर्ग रोखता येतो , हे सिध्द करणारा कोणताही पुरावा नाही.
✔ क्लोरिन किंवा इतर काही रसायने शरीरावर फवारल्याने डोळे चुरचुरणे, त्वचेला खाज येणे, काही वेळा मळमळल्यासारखे वाटणे अथवा उलटी होणे असे परिणाम होऊ शकतात. सोडियम हायपोक्लोराईट अभित्वचेद्वारे शोषले गेल्याने श्वास घेण्यास त्रास (Bronchospasm) होऊ शकतो.
✔ या प्रकारच्या उपायांमुळे सुरक्षेची खोटी भावना मनात निर्माण होऊन हात वारंवार धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग या महत्वाच्या आणि प्रभावी उपायांकडे दुर्लक्ष होऊ शकते.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ३४५१ १५१
ठाणे २२
ठाणे मनपा १५०
नवी मुंबई मनपा ९४
कल्याण डोंबवली मनपा ९३
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा
मीरा भाईंदर मनपा ८१
पालघर १८
१० वसई विरार मनपा १११
११ रायगड १६
१२ पनवेल मनपा ३४
  ठाणे मंडळ एकूण ४०७७ १६९
१३ नाशिक
१४ नाशिक मनपा
१५ मालेगाव मनपा ८५
१६ अहमदनगर २१
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे
१९ धुळे मनपा
२० जळगाव
२१ जळगाव मनपा
२२ नंदूरबार
  नाशिक मंडळ एकूण १३५ १२
२३ पुणे १९
२४ पुणे मनपा ६४६ ५२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५१
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा २५
२८ सातारा १३
  पुणे मंडळ एकूण ७५४ ५९
२९ कोल्हापूर
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली २६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी
  कोल्हापूर मंडळ एकूण ४५
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा ३४
३७ जालना
३८ हिंगोली
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण ३८
४१ लातूर
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा
  लातूर मंडळ एकूण १२
४७ अकोला
४८ अकोला मनपा
४९ अमरावती
५० अमरावती मनपा
५१ यवतमाळ १६
५२ बुलढाणा २१
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ६०
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ७६
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण ८२
  इतर राज्ये १५
  एकूण ५२१८ २५१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *