Breaking News

कालच्या तुलनेत राज्यात १२१ कमी रूग्ण बाधीत ४३१ने संख्या वाढत ५ हजार ६ ४९ वर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मागील तीन दिवसांपासून वाढत राहीलेली संख्या आज कमी झाली आहे. आज दिवसभरात ४३१ रूग्णांचे निदान झाले असून काल रूग्णांची संख्या ५५२ वर पोहोचली होती. त्यातुलनेत आज १२१ ने कमी रूग्ण आढळून आले आहेत. तर १८ रूग्णांचे निधन झाले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ५ हजार ६४९ वर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत. )
आज राज्यात १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १०, २ पुणे येथे, २ औरंगाबाद येथे तर कल्याण डोंबिवली येथे १, सोलापूर मनपा येथे १, जळगाव येथे १आणि मालेगाव येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्यांपैकी १४ पुरुष तर ४ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६१ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २६९ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९०,२२३ नमुन्यांपैकी ८३,९७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५६४९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४६५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६७९८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –
1. आजपर्यंत राज्यातून ७८९ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
2. सध्या राज्यात १,०९,०७२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,०५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ३६८३ १६१
ठाणे २४
ठाणे मनपा १६६
नवी मुंबई मनपा १०१
कल्याण डोंबवली मनपा ९७
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा
मीरा भाईंदर मनपा ८१
पालघर १९
१० वसई विरार मनपा ११५
११ रायगड १६
१२ पनवेल मनपा ३५
ठाणे मंडळ एकूण ४३४५ १८०
१३ नाशिक
१४ नाशिक मनपा
१५ मालेगाव मनपा ९४
१६ अहमदनगर २१
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे
१९ धुळे मनपा
२० जळगाव
२१ जळगाव मनपा
२२ नंदूरबार
नाशिक मंडळ एकूण १५६ १४
२३ पुणे १९
२४ पुणे मनपा ७३४ ५४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५२
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा ३०
२८ सातारा १६
पुणे मंडळ एकूण ८५१ ६२
२९ कोल्हापूर
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली २६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी
कोल्हापूर मंडळ एकूण ४५
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा ३७
३७ जालना
३८ हिंगोली
३९ परभणी
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण ४८
४१ लातूर
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा
लातूर मंडळ एकूण १३
४७ अकोला ११
४८ अकोला मनपा १०
४९ अमरावती
५० अमरावती मनपा
५१ यवतमाळ १८
५२ बुलढाणा २४
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ७१
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ९७
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
नागपूर एकूण १०३
इतर राज्ये १७
एकूण ५६४९ २६९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *