Breaking News

सलग ६ व्या दिवशी १ हजाराहून अधिक रूग्ण २४ हजार ४२७ वर राज्याची संख्या: ५३ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्या आज सलग सहाव्या दिवशी १ हजारने वाढली असून २४ तासात १ हजार २६ रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्याची रूग्णांची संख्या २४ हजार ४२७ वर पोहोचली असून ५३ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ५ हजार १२५ रूग्ण बरे होवून घरी गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबईतील रूग्णांची संख्या जवळपास १५ हजारावर अर्थात १४ हजार ९४७ वर पोहोचली आहे. तर मुंबई आणि ठाणे मंडळाची संख्या १८ हजार ३३७वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण मृतकांचा आकडा ९ २१ वर पोहोचली आहे.
( टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २०६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आजपासून आय सी एम आर पोर्टलनुसार अहवाल देण्यास सुरुवात केली असल्यामुळे त्यांचा अहवाल दिनांक ११ मे २०२०दुपारी २.०० ते मध्यरात्री ११.५९ पर्यंतचा आहे.)
मृत्यू –
आज राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २८, पुण्यात ६, पनवेलमध्ये ६ , जळगावमध्ये ५ , सोलापूर शहरात ३, ठाण्यात २, रायगडमध्ये १, औरंगाबाद शहरात १, आणि अकोला शहरात १ मृत्यू झाला आहे.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती –
आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये ( ६६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ९२१ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,२१,६४५ नमुन्यांपैकी १,९५,८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २४,४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२८९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२,९२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५४.९२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –
1. आजपर्यंत राज्यातून ५१२५ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
2. सध्या राज्यात २,८१,६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५,६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       १४९४७ ५५६
ठाणे           १४०
ठाणे मनपा १००४ ११
नवी मुंबई मनपा ९५५
कल्याण डोंबवली मनपा ३८४
उल्हासनगर मनपा ५३
भिवंडी निजामपूर मनपा ३५
मीरा भाईंदर मनपा २४३
पालघर ३८
१० वसई विरार मनपा २६३ १०
११ रायगड १२९
१२ पनवेल मनपा १४६
  ठाणे मंडळ एकूण १८३३७ ६०३
१३ नाशिक ८२
१४ नाशिक मनपा ४३
१५ मालेगाव मनपा ६१६ ३४
१६ अहमदनगर ५४
१७ अहमदनगर मनपा १०
१८ धुळे
१९ धुळे मनपा ५४
२० जळगाव १५२ १५
२१ जळगाव मनपा ४०
२२ नंदूरबार २२
  नाशिक मंडळ एकूण १०८२ ६९
२३ पुणे १६७
२४ पुणे मनपा २६२१ १५५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४९
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा ३०८ १९
२८ सातारा १२३
  पुणे मंडळ एकूण ३३७७ १८५
२९ कोल्हापूर १३
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ३४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी ५५
  कोल्हापूर मंडळ एकूण ११८
३५ औरंगाबाद ९४
३६ औरंगाबाद मनपा ५५९ १५
३७ जालना १६
३८ हिंगोली ६१
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण ७३२ १६
४१ लातूर २६
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा ४२
  लातूर मंडळ एकूण ८२
४७ अकोला १८
४८ अकोला मनपा १५१ ११
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ८४ ११
५१ यवतमाळ ९८
५२ बुलढाणा २५
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ३८३ २६
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा २६६
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण २७५
  इतर राज्ये ४१ १०
  एकूण २४४२७ ९२१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *