मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात गेले काही दिवस कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असुन यासंबंधीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभर पोलिस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
गेले काही दिवस राज्यांत माध्यमांची गळचेपी होत असून, समाज माध्यमांवर सरकार विरोधात व्यक्त होणाऱ्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्याविरोधात असंविधानीक भाषेत टिपणी होत असून, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना थेट एनकाऊंटरच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि राज्यातील जनतेच्या रक्षणासाठी कटीबद्ध असणाऱ्या पोलिसांवरही हल्ले होत आहेत.
ही सर्वच परिस्थिती लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवी असुन राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारी आहे. या गंभीर परिस्थिती विरोधात योग्य ती पावले उचलून हे प्रकार लवकरात लवकर थांबावेत यासाठी मुंबई, ठाणे, धुळे या शहरांसोबत राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. याआधी २ मे रोजी सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी भाजपाच्या वतीने असे निवेदन सादर करण्यात आले होते.
Tags attaks on police bjp covid-19 devendra fadnavis Governor bhagatshigh koshyari social media
Check Also
काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …