Breaking News

आज पुन्हा शंभरीपार मृत्यूची नोंद होत संख्या पोहोचली ३ हजाराच्या जवळ २७३९ नव्या रूग्णांचे निदान मुंबईची वाटचाल ५० हजाराकडे

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. काल १३९ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आज पुन्हा १२० जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यतच्या मृतकांची संख्या २ हजार ९६९ वर पोहोचली आहे. एकट्या मुंबई महानगरात १९९३ जणांचे मृत्यू झाले आहे. आज २७३९ नव्या रूग्णांचे निदान झाले असून एकूण रूग्णांची संख्या ८२ हजार ९६८ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४२ हजार ६०० वर पोहोचली असून मागील २४ तासात २२३४ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ३७ हजार ३९० वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४५.०६ % एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ३.५७ %. सध्या राज्यात ५,४६,५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,७४१ खाटा उपलब्ध असून सध्या २९,०९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मृत्यू –राज्यात १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ९० मुंबई -५८, ठाणे – १०, नवी मुंबई -६, उल्हास नगर – ६, मीरा भाईंदर -५ वसई विरार -१, भिवंडी -३,पालघर -१.
नाशिक  नाशिक -५, मालेगाव – २
पुणे १७ पुणे  -१०, सातारा – ५, सोलापूर -२
औरंगाबाद औरंगाबाद  मनपा २
अकोला अकोला मनपा – २, अमरावती – २

जिल्हानिहाय एकूण बाधीत रूग्ण,  बरे झालेल्या रूग्णांची संख्या,   अॅक्टीव्ह रूग्ण आणि मृत पावलेल्यांची माहिती-

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ४७३५४ १९९७७ १५७७ २५७९४
ठाणे १२४६४ ४६८६ ३२२ ७४५६
पालघर १३८६ ५८१ ३९ ७६६
रायगड १४११ ७१७ ५५ ६३७
नाशिक १४१२ १०१२ ८८ ३१२
अहमदनगर १९० ८९ ९३
धुळे २३१ १०८ २१ १०२
जळगाव ९६३ ४११ १०९ ४४३
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ४० २८
१० पुणे ९२८९ ५१९५ ४०० ३६९४
११ सोलापूर १२६१ ६२० ९६ ५४५
१२ सातारा ६२६ २९१ २७ ३०८
१३ कोल्हापूर ६३८ ३३४ २९८
१४ सांगली १४५ ८६ ५५
१५ सिंधुदुर्ग ११३ १७ ९६
१६ रत्नागिरी ३५२ १५८ १० १८४
१७ औरंगाबाद १८६१ ११८१ ९२ ५८८
१८ जालना १७७ ८५ ८९
१९ हिंगोली २०६ १६३ ४३
२० परभणी ७८ ४६ २९
२१ लातूर १३५ ९४ ३७
२२ उस्मानाबाद ११८ ५८ ५७
२३ बीड ५३ ३८ १४
२४ नांदेड १६८ १०४ ५७
२५ अकोला ७६२ ४३९ ३५ २८७
२६ अमरावती २८९ १६६ १८ १०५
२७ यवतमाळ १६० १०४ ५४
२८ बुलढाणा ८६ ४८ ३५
२९ वाशिम
३० नागपूर ७३८ ४१६ ११ ३११
३१ वर्धा
३२ भंडारा ३९ १८ २१
३३ गोंदिया ६८ ५७ ११
३४ चंद्रपूर ३१ २५
३५ गडचिरोली ४१ २५ १६
इतर राज्ये /देश ६५ १८ ४७
एकूण ८२९६८ ३७३९० २९६९ ४२६००

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १२१ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.)

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *