मुंबई : प्रतिनिधी
काल ३१ डिसेंबर २०२० या वर्ष अखेरच्या दिवशी राज्यात जवळपास समसमान बाधित आणि घरी जाणाऱ्यांची संख्या होती. मात्र आज वर्षाच्या पहिल्या दिवशी ३ हजार ५२४ नवे बाधित आढळून आले आहेत. तर घरी जाणाऱ्यांच्या संख्येत १ हजाराने वाढ ४ हजार २७९ इतके बाधित बरे होवून घरी गेले असल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या एकूण १८,३२,८२५ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.६४ % एवढे झाले आहे. राज्यात आज ५९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% इतका राहीला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२८,२३,८३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,३५,६३६ (१५.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर ५२, ०८४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात २,६९,३४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,३१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.