Breaking News

कोरोना: २१ दिवसानंतर पुन्हा राज्यात ५१ हजार अॅक्टीव्ह रूग्ण आजही १०० हून अधिक मृत्यू तर ३ हजाराहून अधिक रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात मे महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधीतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने एकूण रूग्णांच्या संख्येतून बरे होवून घरी गेलेल्या रूग्णांची संख्या कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार २४ मे २०२० रोजी राज्यात एकूण ५० हजार २३१ रूग्ण होते. आज पुन्हा २१ दिवसांनी ५० हजार अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या पार करत ५१ हजार ३७९ वर पोहोचली. ११३ रूग्णांचा मृत्यू तर ३४२७ नव्या रूग्णांची नोंद तर १५५० रूग्ण बरे झाल्याने घरी पाठविण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४७.२ % एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ३.७ %. सध्या राज्यात ५,८३,३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५८० संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७९,०७४ खाटा उपलब्ध असून सध्या २८,२०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मृत्यू –राज्यात ११३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ८७ मुंबई -६९, ठाणे -३, नवी मुंबई -८, कल्याण डोंबिवली -१, पनवेल -६
पुणे १९ पुणे  -१०, सोलापूर -८, सातारा – १.
औरंगाबाद औरंगाबाद – ३
लातूर लातूर -२, नांदेड -१
अकोला यवतमाळ – १

राज्यात आज रोजी एकूण ५१,३७९  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हा निहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ५६८३१ २५९४७ २११३ २८७६३
ठाणे १७३०६ ६८१८ ४२५ १००६२
पालघर २२१६ ७१४ ४८ १४५४
रायगड १७८१ ११४८ ६४ ५६७
नाशिक १८५२ ११७० १०२ ५८०
अहमदनगर २३५ १६६ ६०
धुळे ३५३ १९९ २६ १२७
जळगाव १६३३ ६५३ १२० ८६०
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ४८ ३० १४
१० पुणे ११७२२ ६५६७ ४६९ ४६८६
११ सोलापूर १७३८ ६५४ १२८ ९५६
१२ सातारा ७३१ ४१९ २८ २८४
१३ कोल्हापूर ६९२ ५२१ १६३
१४ सांगली २२१ ११४ १००
१५ सिंधुदुर्ग १५० ७६ ७४
१६ रत्नागिरी ३९२ २५६ १५ १२१
१७ औरंगाबाद २५६० १४०० १२८ १०३२
१८ जालना २५८ १५६ ९६
१९ हिंगोली २३६ १८४ ५१
२० परभणी ८१ ६८ १०
२१ लातूर १६३ ११८ ३७
२२ उस्मानाबाद १४३ १०० ४०
२३ बीड ७४ ४९ २३
२४ नांदेड २०४ १३७ १० ५७
२५ अकोला ९९० ५०९ ४० ४४०
२६ अमरावती ३३५ २४३ २१ ७१
२७ यवतमाळ १७६ १३४ ३९
२८ बुलढाणा ११७ ७३ ४१
२९ वाशिम ४१ ३३
३० नागपूर ९८२ ५३९ १२ ४३१
३१ वर्धा १४
३२ भंडारा ४९ ३८ ११
३३ गोंदिया ६९ ६८
३४ चंद्रपूर ४६ २६ २०
३५ गडचिरोली ४९ ३९
  इतर राज्ये /देश ८० २० ६०
  एकूण १०४५६८ ४९३४६ ३८३० १३ ५१३७९

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *