मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्राने आता अधइकृतरित्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्याचे स्पष्ट होत असून काल १२० नव्या रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज पुन्हा १५० रूग्णांचे निदान झाले. यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबईतील असून त्यांची संख्या ११६ आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार १८ वर पोहोचली.
राज्यात दिवसभरात मुंबई ११६, पुणे-१८, अ.नगर ३, बुलढाणा २, ठाणे-२, नागपूर २, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ अशा प्रमाणात कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत.