Breaking News

हवामान

बंगालच्या समुद्रातील मिचौंग चक्रीवादळ तामिळनाडू, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार

नैसर्गिक वातावरणात सातत्याने बदल घडत आहे. या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरात काल सोमवारी निर्माण झालेल्या मिचौंग चक्रिवादळ दक्षिण भारताच्या समुद्री किनारी भागात ५ डिसेंबरला धडकणार असल्याचा इशारा यापूर्वीच भारतीय हवामान खात्याने दिला. या चक्रिवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाँडिचरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू मध्ये आज दिवसभर मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक …

Read More »

हवामान खात्याचा इशारा ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील २४ तासांत मुंबई, पुणे कोकणासह राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, उत्तर कर्नाटकच्या काही भागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येणाऱ्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, दक्षिण कोकणातील …

Read More »

राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुंबईतील रस्ते १००० टँकर्सच्या पाण्याने धुणार

राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात उपाय योजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहिम स्वरुपात काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरीता १००० टॅंकर्स लावावेत त्यासाठी विशेथ …

Read More »

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील ३ शहरे, यादी पाहा भारतातील या दिल्ली, मुंबईनंतर या तिसऱ्या शहराचा समावेश

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी स्विस समूह आईक्यूएअरने जाहीर केली आहे. या यादीत भारतातील तीन शहरांचा समावेश आहे. यादीत अति प्रदुषित शहरांचा समावेश असून या शहरांमधील हवेची स्थिती अत्यंत वाईट पातळीवर आहे. हे प्रदुषण नागरिकांसाठी घातक आहे. आईक्यूएअरच्या या यादीनुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील …

Read More »

आपत्तीमध्ये आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्वाचा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे प्रतिपादन

राज्यात येणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कालावधीत आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य यांचा समन्वय ठेवला जातो. याशिवाय लष्कर, नौदल, तटरक्षक दल, राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या समन्वयातून प्रत्येक आपत्तीला आपण खंबीरपणे तोंड देऊ शकतो, हे वारंवार सिद्ध केले आहे, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल …

Read More »

चार तासाच्या पावसाने नागपूरचीही तुंबई: ट्विटरवरील काही व्हिडिओ रस्त्यावर साचले चार ते पाच फुट पाणी

ऐरवी मान्सूनच्या पावसाने मुंबईत पावसाच्या पाण्याने नाले तुंबून मुंबईची तुंबई होण्याचा प्रकार काही नवा नाही. मात्र नागपूर शहर राज्याची उपराजधानी म्हणून आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु या राज्याला आणि देशाला नियोजन पध्दतीने विकासाचा सल्ला देणाऱ्या …

Read More »

दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह पश्चिमेकडून पूर्व आणि उत्तर ते दक्षिण भारतात पावसाने दमदार हजेरी वंदे भारत, शताब्दी, गतिमान आणि राजधानीसह २० गाड्या उशिराने धावल्या

वसामुळे दिल्लीतील तापमानाचा पारा सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने घसरला. कमाल तापमान २८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या २४ तासांत ३८.६ मिमी पावसाची नोंद झाली. तीन दिवसांच्या पावसासोबतच चमोलीत हंगामातील पहिला हिमवृष्टीही झाली. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये थंडी सुरू झाली. केदारनाथच्या डोंगरांव्यतिरिक्त नीलकंठ, बद्रीनाथ …

Read More »

हवामान खात्याचा इशाराः पाऊस राहणार महिनाभर मुंबई, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात कोसळण्याचा अंदाज

मागील ऑगस्टचा महिना जवळपास कोरडा राहिल्याने राज्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जन्माष्टमीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबई कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात जवळपास महिनाभर हजर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या कालावधीत अनेक जिल्ह्यांच्या तहानलेल्याना …

Read More »

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. नॅशनल वेटलँड ॲटलसनुसार राज्यात असलेल्या सुमारे २३ हजार पाणथळ जागांचे सर्व्हेक्षण केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून करावे. त्याबाबतचे अहवाल वर्षभरात प्राधिकरणासमोर ठेवण्यात यावेत असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

पावसासाठी नव्हे तर या कारणासाठी पुढील २४ तासांकरिता या जिल्ह्यांना येलो अलर्ट अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ६५ – ११५ मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील …

Read More »