Breaking News

सामाजिक

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने कमावली १४० पदके महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री महाजन म्हणाले, या घ‌वघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. …

Read More »

रामदास आठवले यांची ग्वाही, आंतरजातीय विवाह योजनेतील जाचक अट शिथील करणार

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांमध्ये बौद्ध पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी यासंदर्भात असणारी हिंदू विवाह कायद्याचीम अट शिथिल करण्यासाठी प्रयन्त करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली. तसेच सामाजिक न्याय मंत्रालयाच्या योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी विभागीय स्तरावर सामाजिक न्याय विभागाने …

Read More »

संजय गांधी योजनेसाठी ६२५, श्रावणबाळ निवृत्ती वेतनसाठी १ हजार १९४ कोटी रुपयांचे वितरण राज्य सरकारकडून अनुदानाचे वाटप

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ६२५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ११९४ कोटी रुपये निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, …

Read More »

राज्यातील अंगणवाडीसाठी अंगणवाडी दत्तक धोरण सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा

राज्यात लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री लोढा बोलत होते. यावेळी प्रधान सचिव आय.ए.कुंदन, …

Read More »

भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये वाद उफाळला

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये केलेल्या धर्मातंरास ६६ वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये वाद उफाळला आहे. दिक्षाभूमी परिसरात राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यावरून हा वाद उफाळला असून दिक्षाभूमी परिसर राजकीय मंच झाल्याची टीका करीत भारतीय बौद्ध महासभेने (दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) येत्या ५ …

Read More »

बाल न्याय अधिनियमातील कायद्यानुसार भारतातील पहिले दत्तक विधान नगर मध्ये दत्तक विधानाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना

२३ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात कार्यान्वित झालेल्या बाल न्याय अधिनियमातील नवीन बदलानुसार भारतातील पहिले दत्तक विधान आज अहमदनगर मध्ये संपन्न झाले. स्नेहालय संचालित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने यासंदर्भात पथदर्शी काम केले. भारतातील  दत्तक विधान  प्रक्रियेला मोठा ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा आहे. तथापी समाजात दत्तक विधानाबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा होत्या. …

Read More »

शरद पवार म्हणाले, त्या अमानवी गोष्टींना तथागत गौतम बुध्दांनी विरोध करत… सत्यशोधक समाजाचे विचारच देशाला जातीपातीच्या व धर्मभेदाच्या यादवीतून वाचवू शकतात - छगन भुजबळ

महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्याचं हे काम पुढे नेन्याचे काम हे अतिशय चिकाटीचं आहे, गरजेचे आहे. कारण महात्मा महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा विचार …

Read More »

नवरात्र उत्सव मंडळांनो अधिकृत वीजजोडणी घ्या अन् अपघात टाळा अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. नवरात्र उत्सव २६ सप्टेंबरपासून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महावितरणकडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या …

Read More »

पंढरपूरच्या विकास आराखड्यात सहभागी होण्याची संधी विकास आराखड्याबाबत 26 सप्टेंबरपर्यंत लेखी सूचना द्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयामध्ये समाविष्ट कामाबाबत १२ सप्टेंबर २०२२ रोजी खासदार, आमदार, मंदीर समितीचे विश्वस्त, पालखी सोहळयाचे विश्वस्त, व्यापारी प्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. आराखड्याबाबत आणखी काही सूचना असतील तर लेखी स्वरूपात 26 सप्टेंबर २०२२ पर्यंत देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. आराखड्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पालखी …

Read More »

निवडूण आलेल्या महिलांची ग्वाही, आम्हीही देऊ गावाच्या विकासात योगदान ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या प्रशिक्षणानंतरच्या भावना

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हीही गावाच्या विकासात योगदान देऊ शकतो आणि डिजिटल कारभारातही आम्ही मागे राहणार नाही. सरपंचासाठी असलेल्या डिजिटल सहीचा दक्षतापूर्व व प्रभावीपणे वापर करु, असा विश्वास राज्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणानंतर अनेक महिला सदस्यांनी व्यक्त केला. विविध जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतीच्या जानेवारी २०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या. यात …

Read More »