Breaking News

कृषी

पूरस्थितीमुळे बाधित ९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ७७४ कोटी मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पूरस्थितीमुळे बाधित ९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७७४ कोटी रुपयांची मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. कालच १४ बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८६० कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली असून वाटपास सुरुवातही झाली आहे. कोणत्याही बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून …

Read More »

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी इच्छुक पात्र शेतकाऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून “कृषी कर्ज मित्र” योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका आणि पतपेढ्यांमार्फत …

Read More »

केंद्रीय कृषीमंत्री तोमरजी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरपाई द्यायचीय विम्याचे पैसे द्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात जुलै-२०२१ मध्ये पावसाने दिलेली ओढ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर -२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले.  शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा ९०० कोटी रुपयांचा केंद्राचा हिस्सा लवकरात लवकर द्यावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणे शक्य होईल, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह …

Read More »

३३ टक्के किंवा त्याहून अधिक शेतीनुकसान झालेल्या बाधितांना मिळणार भरपाई गारपीट व अवेळी पावसामुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी १२२ कोटी मंजूर

मुंबई : प्रतिनिधी गारपीट व अवेळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने शेतपिकाच्या …

Read More »

विमा कंपन्यांनों स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी निकाली काढा कृषि मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी विमा कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक काढणी पश्चात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मंत्री भुसे यांच्या …

Read More »

उत्तर प्रदेशात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाने चिरडले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशव मोर्या यांच्या ताफ्यातील वाहने चढविली

लखीमपूर खेरी-वृत्तसंस्था: प्रतिनिधी केंद्राच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मोर्या यांच्या ताब्यातील एका वाहनाने थेट शेतकऱ्यांवरच वाहन चढविले. त्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे तर आंदोलनकर्त्ये शेतकऱ्यांनी यात ८ जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचा दावा …

Read More »

शेतकऱ्यांसाठी खुषखबर : मागेल त्याला ठिबक सिंचन मिळणार कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

सातारा : प्रतिनिधी कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले. किन्हई येथे भुसे यांच्या हस्ते पिक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. …

Read More »

मंत्रालयातल्या सचिवांचे बाबूंना निर्देश, “प्रत्येक शेतकऱ्यांला लखपती करा” मृद व जलसंधारण विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांचे आदेश

सोलापूर : प्रतिनिधी राज्य असो किंवा केंद्र सरकार असो तेथील विभागाच्या प्रमुख पदी एखाद्या सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येते. मात्र त्या विभागाच्या प्रमुख पदी असलेल्या सनदी अधिकाऱ्याकडून विभागाच्या लाभार्थ्यांनाच त्याचा योग्य लाभ मिळावा आणि आर्थिक उन्नती व्हावी यासाठी विभागातील अधिकाऱ्यांना थेट आदेश देण्यारा सनदी अधिकारी विरलाच म्हणावा लागेल. सध्या सोलापूर …

Read More »

शेतकऱ्यांसाठी खुषखबर: आता मोफत घरपोच सातबारा मिळणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा

श्रीरामपूर : प्रतिनिधी महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता २ ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी घेण्यात येत असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर येथे केली. नागरिकांना सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल …

Read More »

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा होणार समावेश शालेय आणि कृषी विभाग तयार करणार अभ्यासक्रम-शालेय शिक्षणमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या …

Read More »