Breaking News

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ शैक्षणिक सत्रापासून सुरू होणाऱ्या इयत्ता ११ आणि १२ वीच्या वर्षअखेरीच्या परीक्षांच्या स्वरूपामध्ये बदल केले आहेत. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बोर्डाने गेल्या वर्षीच्या तुलनेत सक्षमतेवर आधारित प्रश्नांचे वेटेज १०% ने वाढवले आहे आणि लहान आणि दीर्घ स्वरूपाच्या …

Read More »

लोकसभा निवडणुकीसाठी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ निवडणूक आयोगाची माहिती

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये ३३, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये …

Read More »

आरबीआयचे तिमाही पतधोरण जाहिरः रेपो रेट जैसे थे

आज शुक्रवारी (५ एप्रिल रोजी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने तिमाही पतधोरण जाहिर केले. मात्र वर्तमानस्थितीत आणि फेब्रुवारी महिन्यात असलेल्या महागाईच्या निर्देशांकाचा विचार करत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले यांनी रेपो रेट मध्ये ६.५% इतकाच ठेवण्यात आल्याचे सांगत रेपो रेट जैसे थे असल्याचे जाहिर केले. आरबीआय (RBI) ने २०२४-२५ …

Read More »

बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक

बंगळुरू येथील प्रसिध्द रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट केल्याप्रकऱणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने भाजपाच्या कार्यकर्त्यास आज ताब्यात घेतले. एनआयएने काही दिवसांपूर्वीच रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी १० लाख रूपयांचे बक्षित जाहिर केले होते. यापार्श्वभूमीवर एनआयएने आज या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपाचा कार्यकर्ता साईप्रसाद …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

२०१८ साली पुणे येथील भीमा कोरेगाव हिंसाचारापूर्वी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या शोमा सेन यांना युएपीए कायद्याखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास ५ वर्षानंतर कार्यकर्त्या शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (५ एप्रिल) रोजी जामीन मंजूर केला. शोमा सेन या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. तसेच महिला चळवळीच्या …

Read More »

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

शिवसेना शिंदे गटाचे माढा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माढा संपर्कप्रमुख संजय कोकाटे, …

Read More »

राहुल गांधी यांचे वक्तव्य, इंडिया आघाडी एक वैचारिक निवडणूका…

सध्याच्या विद्यमान निवडणूका या इंडिया आघाडी वैचारिकतेच्या आधारावर निवडणूका लढवित आहे. तसेच लोकसभा निवडणूक ही संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या अशा दोन शक्ती यांच्यात होत आहे अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी मांडली. काँग्रेस पक्षाचा न्यायपत्र जाहिरनामा जाहिर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने…

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स समाज माध्यमावर नाना पटोले यांना …

Read More »

नाना पटोले म्हणाले, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत झाला आहे तर काही बाबतीत न्याय नाकारलाही आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने पाच न्याय व २५ गॅरंटी देत देशातील सर्व समाज घटकांना न्याय …

Read More »

अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी वाढवावी

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी केले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार …

Read More »