मुंबई: प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात आईच्या अंत्यसंस्कार जायला मिळत नसताना आत्महत्या केलेल्या बॉलीवूड स्टार सुशांत सिंग राजपूतप्रकरणी सेलिब्रेटी पार्ट्यांची चर्चा सातत्याने ऐकत मिळत आहेत. या पार्ट्या कोणाच्या आशिर्वादाने सुरू होत्या ? असा सवाल उपस्थित करत या पार्ट्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा नेते अॅड.आशिष शेलार यांनी केली.
लॉकडाऊन काळात अनेकांना घराच्या बाहेर पडणे शक्य नव्हते. मात्र सेलिब्रिटींकडून पार्ट्यांच्या आयोजन होत होते. या पार्ट्या कोणाच्या आशिर्वादाने सुरु होत्या असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांच्या? मंत्र्यांच्या? याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
सुशांत सिंह रजपूतच्या प्रकरणात वारंवार सेलिब्रिटी पार्ट्यांचा उल्लेख होतोय…जेव्हा लॉकडाऊन मध्ये सामान्य माणूस आपल्या आईच्या अंत्यसंस्काराला ही पोहचू शकत नव्हता तेंव्हा अशा पार्ट्या कोणाच्या आशिर्वादाने सुरु होत्या? मंत्र्यांच्या? अधिकाऱ्यांच्या? सीबीआय चौकशी झाली पाहिजे!
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) August 2, 2020